डहाणूपासून वेंगुल्र्यापर्यंत पसरलेल्या ७२० किलोमीटर लांबीच्या विस्तीर्ण कोकण किनारपट्टीच्या विकासाचे नियोजन करण्यासाठी राज्य शासनाने ‘सिडको’ प्राधिकरणाची नियुक्ती केली आहे.
नवी मुंबईतील पाणथळी, खाडीकिनाऱ्या-नजीकच्या जमिनी बांधकाम व्यावसायिकांना बहाल केल्याबद्दल टीकेचा धनी ठरलेल्या सिडकोकडे आता संपूर्ण कोकण किनारपट्टीचा ताबा येणार आहे.