डॉ. बाबासाहेब आंबेडकर (DR Babasaheb Ambedkar) यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशमधील महू येथे झाला. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होत. त्यांनी स्त्री-पुरष समानतेचा पुरस्कार केलेला आहे. अस्पृश्यता, जातीवाद समूळ नष्ट करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. मूकनायक, प्रबुद्ध भारत, बहिष्कृत भारत, जनता, समता या नियतकालिकांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक समतेचा लढा लढला. बहिष्कृत हितकारिणी, स्वतंत्र मजूर पक्ष अशा संघटना उभारून त्यांनी समतेचा लढ्याला अधिष्ठान प्राप्त करून दिले. आंबेडकरांनी आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्य, उद्योग आदी क्षेत्रात अमूल्य योगदान दिलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू ६ डिसेंबर १९५६ रोजी झाला.Read More
आंबेडकरी चळवळीतील बहुतेक मोठ्या नेत्यांना उमेदवारीही मिळण्याची शाश्वती नाही. एकीकडे मराठा, धनगर, ओबीसी आपल्या हक्कांसाठी लढा देत असताना आंबेडकरी चळवळीत…
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथील स्वागत प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यास गावातील एका गटाने विरोध दर्शविल्याने गावात…
संविधान सभेत प्रवेश करण्याची बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती, मात्र शेडय़ूल्ड कास्ट फेडरेशन या बाबासाहेबांच्या पक्षाला १९४६ च्या निवडणुकांमध्ये अपयश आले.