डोंबिवली (Dombivli) हे महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यामधील एक मोठे शहर व कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivli) महानगरपालिका क्षेत्राचा प्रमुख भाग आहे. डोंबिवली हे स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या टप्प्यात निवडले गेले आहे. ०१ ऑक्टोबर १९८३ साली डोंबिवली नगरपालिका आणि कल्याण नगरपालिका मिळून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (क.डों.म.पा.) स्थापन करण्यात आली. डोंबिवलीला प्रामुख्याने मराठी भाषिकांचे, मराठी संस्कृतीचे शहर मानले जाते. हिचा महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून गौरव होतो.
कल्याण (Kalyan) हे महाराष्ट्र राज्यातील ठाणे (Thane) जिल्ह्यामधील एक मोठे शहर, कल्याण-डोंबिवली महानगराचा एक भाग व मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. कल्याण शहर मुंबईपासून ५३ किमी अंतरावर आहे. कल्याण शहर हे उल्हास नदीजवळ वसलेले असून या शहराला ठाणे खाडी व वसई खाडी द्वारे अरबी समुद्राशी जोडले गेले आहे. कल्याण जंक्शन (Kalyan Junction) हे उपनगरीय वाहतूक आणि त्याचप्रमाणे लांबच्या पल्ल्याच्या लोहमार्ग वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. कल्याण शहराचे रेल्वे लाईनमुळे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग पडले आहेत. Read More
कल्याण लोकसभेतील उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार गुरुवारी अंबरनाथ येथे प्रचारासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे…
सर्वाधिक वर्दळीच्या शिळफाटा रस्त्यावरील पलावा चौकातील उड्डाण पूल लवकर बांधून पूर्ण व्हावा म्हणून प्रवासी मागील पाच वर्षापासून शासनाकडे, स्थानिक लोकप्रतिनिधी,…
कल्याण लोकसभेची उमेदवार श्रीकांत शिंदे असतील असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परस्पर जाहीर केल्याने याच मुद्द्यावरून ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ…
नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या डोंबिवलीतील चैत्र पाडव्याला निघणारी नववर्ष स्वागत यात्रा यावेळी रामराज्य आणि मानवी मूलभुत मुल्ये ही संंकल्पना घेऊन…