नरेंद्र दामोदरदास मोदी (Narendra Modi) हे भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. त्यांनी मे २०१४ मध्ये पंतप्रधान पदाची सूत्रं हाती घेतली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीला (BJP) दुसऱ्यांदा प्रचंड विजय मिळवून दिला.
ते वाराणसी मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडून आले. पंतप्रधान बनण्यापूर्वी मोदी यांनी २००१ ते २०१४ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री (Gujarat CM) म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यापूर्वी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय सदस्य होते.
सत्तेत आल्यापासून मोदींनी भाजपाला देशातील सर्वाधिक मजबूत पक्ष बनवला. सध्या बहुतांशी राज्यात भाजपाची सत्ता आहे. गुजरातमध्ये भाजपाला सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिल्यानंतर मोदींनी स्वत:ला राष्ट्रीय व्यासपीठावर आणलं.
Ranveer Singh Angry Reaction: रणवीर सिंह या पोस्टच्या शेवटी लोकांना काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन सुद्धा करताना दिसत आहे. पण याही व्हिडीओमागे एक वेगळीच कहाणी असल्याचे समजतेय.
पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर, बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे, शिरूरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर महाविकास आघाडीतर्फे जाहीर सभा झाली.
१९ एप्रिलला राज्यांतील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान आहे. यात नागपूरचा समावेश आहे. आणि त्याच दिवशी नागपूरच्या शेजारचा जिल्हा वर्धा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा आहे.
मुस्लीम लीगपासून, माशांपर्यंतचे सर्व मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रेटून पाहिले, मात्र त्यातील कोणत्याही मुद्द्याला अद्याप म्हणावे तसे यश आलेले नाही. नेहमीच कोणतेतरी भावनिक नॅरेटिव्ह समोर ठेवून मतदारांवर प्रभाव पाडण्यात तरबेज असलेल्या भाजपची अशी तारांबळ का उडाली आहे?
श्रावण महिन्यात इंडिया आघाडीतील काही नेते मांसाहारावर ताव मारून त्याच्या चित्रफिती तयार करून बहुसंख्याकांच्या भावनांशी खेळत आहेत, अशा आशयाची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केली.
जगातील अनेक महत्त्वाच्या आणि निर्भीड वृत्तपत्रांप्रमाणे आयर्लंडमधील ‘द आयरिश टाइम्स’ या वर्तमानपत्रासही भारतात माध्यमस्वातंत्र्य आणि लोकशाही संकोच होत असल्याचे आढळले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका जाहिरात एजन्सी विरुध्द आचारसंहितेचा भंगाचा गुन्हा दाखल झाल्याची ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील ही पहिली घटना आहे.
भाजपाचे दोन वेळा खासदार राहिलेले विद्यमान खासदार मनोज तिवारी यांच्याविरोधात कन्हैया कुमारची लढत होणार आहे. मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार हे दोघेही पूर्वांचल भागाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे त्यांच्यात अटीतटीचा सामना होणार असल्याची चर्चा रंगलेली आहे. धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करून कन्हैया कुमारला शह देण्याची राजनीती भाजपाने अवलंबली आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये कन्हैयाने विविध प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्यावर एक नजर टाकूयात.