नवी मुंबई (Navi Mumbai) हे महाराष्ट्रातील पहिले नियोजनबद्ध शहर असून त्याचे क्षेत्रफळ १६४ चौरस किलोमीटर आहे. मुंबईतील वाढती लोकसंख्या बघता महाराष्ट्र सरकारने जुलै १९५८ रोजी नवी मुंबई (Navi Mumbai City) हे नवीन शहर वसवण्याचा निर्णय घेतला. तसेच त्याची जबाबदारी सिटी अॅण्ड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉपरेरेशन अर्थात सिडकोकडे देण्यात आली. सिडकोनेही वाणिज्य, रोजगार, दळणवळण, व्यापार, शिक्षण, आरोग्य आणि इतर पायाभूत सुविधांनी सुसज्य असे शहर वसवले. कोणत्याही शहराच्या विकासासाठी रेल्वे ही महत्त्वाची भूमिका बजावत असते.
त्या दृष्टीने सिडकोने भारतीय रेल्वेबरोबर करार करत नवी मुंबईत रेल्वेचे जाळे निर्माण केले. आज मानखुर्द-पनवेल आणि ठाणे-तुर्भे रेल्वे मार्गावर लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. आज राज्याच्या विकासात नवी मुंबई हे महत्त्वाची भूमिका बजावत आहे. Read More
वर्षभरात एका झोपडीच्या पाठोपाठ ७० झोपड्या पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर वसाहतीलगत बेलपाडा गावाच्या मागे भारती विद्यापीठ जवळील डोंगराच्या टेकडीवर वसल्या…
पावसाळ्यापूर्वीच तालुक्यातील पूरग्रस्त गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिरनेर गावातील पाण्याचा निचरा होणारे पाइप व साकवांच्या सफाई व बांधकाम याची सुरुवात…
करोना काळापासून निवडणूक लांबणीवर पडत असल्याने साडेचार वर्षांपासून नवी मुंबई मनपामध्ये प्रशासनराज आहे. याचा फायदा घेत विकासकामांच्या गोंडस नावाखाली भरमसाट…
रायगडमधील शेतकऱ्यांच्या जमिनीवर सिडको, एमएमआरडीए किंवा कोणत्याही शासकीय प्राधिकरणाने विकासाचे नियोजन करण्यापूर्वी येथील स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात घ्यावे, अशा सूचना शेतकरी…
सध्या तीन आसनी रिक्षांना स्थानक परिसरात काम सुरू असल्याने प्रवेशबंदी केल्याने काही रिक्षाचालकांनी पादचाऱ्यांची वाट अडवून पोलिसांच्या कारवाईला ठेंगा दाखविला…