प्रियंका गांधी यांच्या सभेसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांनी आग्रह धरल्यानंतरही त्यांची सभा मिळत नसल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात वापरलेल्या शब्दांनी वाहवत जाऊ नका, तर आगामी लोकसभा निवडणुकीत बदलासाठी मतदान करा असे आवाहन काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वढेरा यांनी शनिवारी केले.
‘‘मला खासदार व्हावेसे वाटत असेल तर मी अमेठी लोकसभा मतदारसंघातून लढावे, अशी तेथील लोकांचीच अपेक्षा आहे,’’ असा दावा ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत वढेरा यांनी केला आहे.
प्रियांका गांधी यांचे पती आणि सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वाड्रा अमेठीमधून निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. स्मृती इराणींना येथील जनता कंटाळली असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेसने अमेठी आणि रायबरेलीतील उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली नाही. त्यामुळे याठिकाणी गांधी घराण्यातील व्यक्ती निवडणूक लढवणार की बाहेरच्या व्यक्तीला संधी दिली जाईल, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
उत्तर प्रदेशातील कानपूर येथे दोन मुलींवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी भाजप सरकारवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी हल्लाबोल केला.