Reliance Jio , Vodafone-Idea आणि Airtel या देशातील सर्वात लोकप्रिय अशा टेलिकॉम कंपन्या आहेत. आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन प्लॅन या कंपन्या लाँच करत असतात. आता देशात ५जी नेटवर्क देखील सुरु झाले आहे. देशातील या कंपन्यांपैकी रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल यांनी संयुक्तपणे नोव्हेंबर २०२३ मध्ये २५ लाख मोबाईल ग्राहक जोडले आहेत. तर आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या वोडाफोन आयडियाने सुमारे १८. ३ लाख ग्राहक गमावले आहेत. रिलायन्स जिओने १४.२६ लाख नवीन ग्राहक जोडून आपली स्थिती मजबूत केली तर एअरटेलने देखील १०.५६ लाख नवीन ग्राहक जोडले आहेत.

ट्रायच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस जीओचे सुमारे ४२२.८ दशलक्ष मोबाईल ग्राहक होते. मागील महिण्यात हा आकडा ४२.१३ क्कॉती इतका होता. भारती एअरटेलच्या ग्राहकांची संख्या आता ३६.६० कोटी झाली आहे. नुकसानीत असलेल्या वोडाफोन आयडियाचे १८.२७ लाख ग्राहक मी झाले आहेत. त्यांच्या ग्राहकांची संख्या ही २४.३७ कोटींवर आली आहे. रिलायन्स जिओने सहा वर्षांपूर्वी टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर शुल्क कमी करण्याची स्पर्धा सुरु केली. त्यामुळे इतर दूरसंचार कंपन्यांनाही त्याच्या प्लॅनच्या किंमती कमी कराव्या लागल्या.

9 year old deadlifting 75 kg viral video
भारतातील सर्वांत शक्तिशाली चिमुरडी! पाहा नऊ वर्षीय ‘धाकड’ मुलीचे शक्तिप्रदर्शन; Video पाहून व्हाल थक्क…
Essel Propack Limited Attractive durable quality in packaging
वेष्टनांतील आकर्षक, टिकाऊ गुणवत्ता
World Oldest Person from Venezuela Juan Vicente Pérez dies at aged 114 Ones Set Guinness World Records
रोज मद्य सेवन करणाऱ्या जगातील सर्वांत वृद्ध व्यक्तीचे निधन; ‘त्यांचे’ कुटुंब पाहिलेत का?
Parineeti Chopra shared photo related pregnancy rumors
परिणीती चोप्रा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण; अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली…

हेही वाचा : Jio Recharge Plan: दिवसभर Instagram Reels बघायचेत, जिओने आणले ‘हे’ सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन

नोव्हेंबरमध्ये एकूण ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या ८२.५३ कोटी इतकी झाली आहे. पाच दूरसंचार सेवा कंपन्यांचा बाजारातील हिस्सा ९८ टक्क्यांपेक्षा जास्त होता. यात रिलायन्स जिओ( सुमारे ४३ कोटी), भारती एअरटेल (सुमारे २३ कोटी) आणि वोडाफोन आयडिया (सुमारे १२.३ कोटी) तर बीएसएनएलचे (२.६ कोटी) इतका समावेश होता.

सर्वात मोठी दुसरी टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने सात क्षेत्रामध्ये १५५ रुपयांचा नवीन प्लॅन लाँच केला आहे. त्यामुळे त्य्नाच्या सर्वात स्वस्त प्लॅनच्या दरामध्ये ५७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही स्कीम सध्या कर्नाटक, बिहार आणि राजस्थानसह सात प्रदेशांसाठी आहे.