scorecardresearch

Premium

सूर्याच्या दिशेने झेपावणाऱ्या Aditya-L1 बाबत मोठी अपडेट, ISRO चा दुसऱ्यांदा मोठा पराक्रम, एका महिन्यात ‘इतकं’ अंतर पार

सूर्याच्या प्रभामंडळाचा (करोना) अभ्यास करण्यासाठी, तसेच सूर्याचा पृथ्वीच्या वातारणावरील प्रभावांचा अभ्यास करण्यासाठी भारताने सौरमोहीम हाती घेतली आहे.

Aditya l1
आदित्य एल-१ ने पृथ्वीचं प्रभावक्षेत्र ओलांडून सूर्याच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो अंतराळात सातत्यान नवनवे पराक्रम गाजवतेय. अंतराळातून इस्रोसाठी नुकतीच एक चांगली बातमी आली आहे. इस्रोच्या सौरमोहिमेला मोठं यश मिळालं असल्याची ही बातमी इस्रोने एक्स (ट्विटर) या मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळाद्वारे दिली आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताने आदित्य एल-१ ही मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत भारताने गेल्या महिन्यात २ सप्टेंबर रोजी आदित्य एल-१ हे अवकाशयान सूर्याच्या दिशेने पाठवलं. आता या अवकाशयानाने त्याच्या प्रवासातील दुसऱा मोठा आणि महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.

इस्रोने नुकतीच माहिती दिली आहे की, आदित्य एल-१ या अवकाशयानाने आतापर्यंत ९.२ लाख किलोमीटर इतकं अंतर पार केलं आहे. आता आपलं अवकाशयान एल-१ बिंदूचा शोध घेत आहे. आदित्यने पृथ्वीच्या प्रभावक्षेत्रातून बाहेर पाऊल टाकलं आहे. पृथ्वीच्या प्रभावक्षेत्राबाहेर जाणारं भारताचं हे आतापर्यंतचं दुसरं अवकाशयान आहे. यापूर्वी भारताने आपलं मार्स ऑर्बिटर मिशन म्हणजेच मंगळयान यशस्वीपणे पृथ्वीच्या प्रभावक्षेत्राबाहेर पाठवलं होतं. त्यापाठोपाठ आता आदित्य एल-१ या अवकाशयानाने पृथ्वीचं प्रभावक्षेत्र ओलांडलं आहे.

raj thackeray express concerns over incidents during ganeshotsav celebrations
उत्सवांमधील उन्मादावर राज ठाकरे यांचे टीकास्त्र; बीभत्सपणा कमी करण्यासाठी प्रयत्नांचे आवाहन
nitin gadkari
देशात २०७० सालापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे ध्येय गाठण्यासाठी बांधकाम क्षेत्रात हरित उपक्रम राबवले जाणार – नितीन गडकरी
nashik eco friendly ganesh visarjan, nashik ganesh visarjan, nashik ganesh visarjan miravnuk, ganesh visarjan artificial lakes nashik
नाशिकमध्ये पर्यावरणस्नेही विसर्जनासाठी तयारी, कृत्रिम तलावांची व्यवस्था, पीओपी मूर्ती नदीपात्रात विसर्जित केल्यास कारवाई
five decision of shinde fadnavis government taken back in one and a quarter years
उलटा चष्मा : मर्यादा २५ हजार करून टाका!

इस्रोने १९ सप्टेंबर रोजी जाहीर केलं होतं की, आदित्य एल-१ ने पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडत लॅरेंज पॉईंट १ च्या दिशेने प्रवास करण्यास सुरुवात केली आहे. इथून पुढे आदित्य एल-१ ला १०० ते १०५ दिवस प्रवास करायचा आहे. इस्रोच्या मते ४ जानेवारी रोजी हे यान एल-१ बिंदूपाशी जाऊन स्थिरावेल.

हे ही वाचा >> विश्लेषण: विक्रम लँडर, प्रज्ञान रोव्हर ‘जागण्या’च्या आशा धूसर? चंद्रयान-३ मोहीम संपुष्टात येणार?

पीएसएलव्हीच्या मदतीने उड्डाण केल्यानंतर सुरुवातीचे १६ दिवस आदित्य एल-१ हे अंतराळयान पृथ्वीभोवतीच लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये परिभ्रमण करत होतं. १९ सप्टेंबर रोजी या अंतराळयानाने चौथ्यांदा पृथ्वीची कक्षा बदलली आणि एल-१ च्या दिशेने प्रवास केला. एखाद्या गोफणीप्रमाणे या यानाने त्याच्या कक्षा बदलल्या. सूर्य आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणांच्या मदतीने या यानाचा सूर्याच्या दिशेने प्रवास सुरू आहे. सुमारे १५ लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर भारताचं हे यान ‘एल-१’ या बिंदूपाशी पोहोचेल. या संपूर्ण प्रक्रियेला १२५ दिवसांचा कालावधी लागेल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aditya l1 spacecraft successfully escapes sphere of earth influence travels 9 2 lakh km in space towards sun asc

First published on: 01-10-2023 at 08:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×