Reliance Jio 5G Service: भारत सध्या Rilance Jio , Airtel आणि VI म्हणजेच वोडाफोन-आयडिया या प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. रिलायन्स जिओ आणि एअरटेल या टेलिकॉम कंपन्यांनी आपली ५ जी सेवा भारतामध्ये सुरु केलेली आहे. यामध्ये रिलायन्स जिओ कंपनी सर्वात आघाडीवर आहे. देशातील अनेक शहरांमध्ये जिओची ५ जी सेवा सुरु झाली आहे. रिलायन्स जिओने देशभरातील २७ शहरांमध्ये आपली ५जी सेवा सुरु केली आहे.

या ५ जी सेवेमध्ये महाराष्ट्रातील एका शहराचा समावेश आहे. आज सुरु झालेल्या सेवेमध्ये राज्यातील सातारा शहराचा समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील १७ शहरांमध्ये जीओची ५ जी सेवा सुरु झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील अकोला, परभणी, अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड-वाघाळा, नाशिक, पुणे, सांगली आणि सोलापूर व सातारा अशा एकूण १७ शहरांमध्ये रिलायन्स जीओची ५ जी सेवा सुरु झाली आहे.

stock market update sensex drops 454 points nifty settle at 21995 print
मंदीवाल्यांचा जोर कायम; ‘सेन्सेक्स’मध्ये ४५४ अंश घसरण
BJP Maharashtra To Be Washed Out NDA TO Loose In More Than 10 States
महाराष्ट्रासह ‘या’ १० राज्यांत भाजपाचा धुव्वा उडवणार इंडिया आघाडी? सर्वेक्षणातील माहितीत ‘ही’ मोठी चूक
Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
mumbai pune share 51 percent of total sales in housing market
घरांच्या बाजारपेठेत मुंबई, पुण्याचा ५१ टक्के वाटा; तिमाहीत सात महानगरांत १.३० लाख घरांची विक्री

हेही वाचा : Reliance Jio Plan: जिओच्या ‘या’ प्लॅनमध्ये मोफत बघता येणार Netflix आणि Prime Video, जाणून घ्या

तर देशातील आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर , छत्तीसगड, कर्नाटक , केरळ , मध्य प्रदेश, महाराष्ट्र , पंजाब, तेलंगणा , तामिळनाडू , उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड व पश्चिम बंगाल या राज्यांमधील २७ शहरांमध्ये ५ जी सेवा जिओने सुरु केली आहे. बुधवारपासून या २७ शहरांमधील रिलायन्स जिओ वापरकर्त्यांना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय Jio वेलकम ओफर अंतर्गत १ Gbps या स्पीडने अनलिमिटेड डेटा वापरता येणार आहे. कामपणीच्या प्रत्येक वापरकर्त्याने Jio True ५ जी सेवेचा लाभ घ्यावा अशी आमची इच्छा असल्याचे रिलायन्स जिओच्या प्रवक्त्याने सांगितले. या वर्षाच्या अखेरीस प्रत्येक शहरांत आणि गावात ५ जी सेवा सुरु करण्याचे जीओचे लक्ष्य आहे.