Reliance Jio 5G Service: भारत सध्या Rilance Jio , Airtel आणि VI म्हणजेच वोडाफोन-आयडिया या प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. रिलायन्स जिओ आणि एअरटेल या टेलिकॉम कंपन्यांनी आपली ५ जी सेवा भारतामध्ये सुरु केलेली आहे. यामध्ये रिलायन्स जिओ कंपनी सर्वात आघाडीवर आहे. देशातील अनेक शहरांमध्ये जिओची ५ जी सेवा सुरु झाली आहे. रिलायन्स जिओने देशभरातील २७ शहरांमध्ये आपली ५जी सेवा सुरु केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या ५ जी सेवेमध्ये महाराष्ट्रातील एका शहराचा समावेश आहे. आज सुरु झालेल्या सेवेमध्ये राज्यातील सातारा शहराचा समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील १७ शहरांमध्ये जीओची ५ जी सेवा सुरु झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील अकोला, परभणी, अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड-वाघाळा, नाशिक, पुणे, सांगली आणि सोलापूर व सातारा अशा एकूण १७ शहरांमध्ये रिलायन्स जीओची ५ जी सेवा सुरु झाली आहे.

हेही वाचा : Reliance Jio Plan: जिओच्या ‘या’ प्लॅनमध्ये मोफत बघता येणार Netflix आणि Prime Video, जाणून घ्या

तर देशातील आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर , छत्तीसगड, कर्नाटक , केरळ , मध्य प्रदेश, महाराष्ट्र , पंजाब, तेलंगणा , तामिळनाडू , उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड व पश्चिम बंगाल या राज्यांमधील २७ शहरांमध्ये ५ जी सेवा जिओने सुरु केली आहे. बुधवारपासून या २७ शहरांमधील रिलायन्स जिओ वापरकर्त्यांना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय Jio वेलकम ओफर अंतर्गत १ Gbps या स्पीडने अनलिमिटेड डेटा वापरता येणार आहे. कामपणीच्या प्रत्येक वापरकर्त्याने Jio True ५ जी सेवेचा लाभ घ्यावा अशी आमची इच्छा असल्याचे रिलायन्स जिओच्या प्रवक्त्याने सांगितले. या वर्षाच्या अखेरीस प्रत्येक शहरांत आणि गावात ५ जी सेवा सुरु करण्याचे जीओचे लक्ष्य आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance jio launch 5g service in 27 cities satara maharashtra available in 331 cities in country tmb 01
First published on: 09-03-2023 at 16:22 IST