जिल्ह्यात मंगळवारी १ हजार २५९ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील करोनाबाधितांची एकुण संख्या १ लाख ७३ हजार ७४ इतकी झाली आहे. तर, दिवसभरात ३० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची एकुण संख्या ४ हजार ४२६ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात मंगळवारी ठाणे शहरातील ३३०, नवी मुंबईतील ३२३, कल्याण-डोंबिवलीतील १७८, ठाणे ग्रामीणमधील १३३, मीरा-भाईंदरमधील १३२, बदलापूर शहरातील ५८, उल्हासनगर शहरातील ५०, भिवंडी  ३० आणि अंबरनाथ २५ रुग्णांचा समावेश आहे.