जिल्ह्य़ात गुरुवारी १९२१ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील करोनाबाधितांच्या संख्येने ३६ हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

सर्वाधिक रुग्ण कल्याण आणि ठाणे शहरांतील आहेत, तर जिल्ह्य़ात दिवसभरात ३१ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या १ हजार १३० वर पोहोचली आहे.

नव्या रुग्णांमध्ये कल्याण-डोंबिवली शहरातील ५६०, ठाणे शहरातील ३९५, नवी मुंबईतील २६५, उल्हासनगर शहरातील १७४, मीरा-भाईंदर शहरातील १७१, ठाणे ग्रामीणमधील १५४, भिवंडी शहरातील ८८, अंबरनाथ शहरातील ६३ आणि बदलापूर शहरातील ५१ रुग्णांचा समावेश आहे. ठाणे जिल्ह्य़ात गुरुवारी ३१ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये ठाण्यातील ११, नवी मुंबईतील सात, कल्याणमधील चार, मीरा-भाईंदरमधील चार, भिवंडीतील दोन, ठाणे ग्रामीणमधील दोन आणि अंबरनाथमधील एका रुग्णाचा समावेश आहे.