ठाणे : जिल्ह्य़ात शनिवारी १ हजार ५६६ नवे करोना रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या ९६ हजार ९६० वर पोहोचली आहे.

शनिवारी दिवसभरात ७५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यू झालेल्यांपैकी ४० रुग्ण हे भिवंडी शहरातील आहेत.शनिवारी मृत्यू झालेल्यांमध्ये भिवंडीतील ४०, कल्याण-डोंबिवलीतील १०, नवी मुंबईतील ७, मीरा-भाईंदरमधील ५, ठाणे शहरातील ४, उल्हासनगरमधील ४, ठाणे ग्रामीणमधील ४ आणि अंबरनाथमधील एका रुग्णाचा समावेश आहे.

भिवंडीतील मृत्यू संख्येबाबत  पालिका प्रशासनाशी संपर्क साधला असता, शनिवारी दगावलेले सर्व रुग्ण ठाणे आणि मुंबईत उपचार घेत होते. भिवंडी शहरातील रुग्णालयांमध्ये एकाही करोना रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे सांगण्यात आले.