जिल्ह्य़ात गुरुवारी १ हजार ५७६ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील करोनाबाधितांची संख्या ८४ हजार ३६४ इतकी झाली आहे. तर, दिवसभरात ३७ जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्य़ात मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या २ हजार ३२१ इतकी झाली आहे.

जिल्ह्य़ात गुरुवारी आढळलेल्या १ हजार ५७६ रुग्णांमध्ये नवी मुंबईतील ३६०, कल्याण-डोंबिवली शहरातील ३२९, ठाणे शहरातील २७७, ठाणे ग्रामीणमधील २०६, मीरा-भाईंदर शहरातील २०५, उल्हासनगरमधील ६८, बदलापूरमधील ६७, अंबरनाथ शहरातील ३९ आणि भिवंडीतील २५ रुग्णांचा समावेश आहे. तर कल्याण-डोंबिवलीतील ११, ठाण्यातील १०, नवी मुंबईतील चार, उल्हासनगरमधील चार, मीरा-भाईंदरमधील तीन, ठाणे ग्रामीणमधील तीन आणि अंबरनाथमधील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.