जिल्ह्यात बुधवारी १ हजार ६९१ करोनाबाधित आढळून आले. त्यामुळे जिल्ह्य़ातील एकूण रुग्णसंख्या ७२ हजार २०४ इतकी झाली आहे. बुधवारी जिल्ह्य़ात ४० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, एकूण मृत्यूसंख्या २ हजार ९ इतकी झाली आहे.

बुधवारी आढळलेल्या रुग्णांत कल्याण डोंबिवली शहरातील ४२१, ठाणे शहरातील ३२७, नवी मुंबईतील ३०३, ठाणे ग्रामीणमधील १९९, उल्हासनगरमधील १५१, मीरा-भाईंदर शहरातील ११६, बदलापूर शहरातील ७०, अंबरनाथमधील ६९ आणि भिवंडीतील ३५ रुग्णांचा समावेश आहे. तर, बुधवारी जिल्ह्य़ात ४० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून त्यामध्ये कल्याण-डोंबिवलीतील ८, नवी मुंबईतील ६, ठाण्यातील ५, मीरा-भाईंदरमधील ५, उल्हासनगरमधील ५, बदलापुरातील ४, अंबरनाथमधील ३ तर भिवंडी आणि ठाणे ग्रामीणमधील प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे.