ठाणे : करोनाकाळामध्ये मध्य रेल्वेची वाहतूक पूर्ण सुरळीत नसली तरीही रेल्वेमार्गावर रेल्वे रूळ ओलांडणे, रेल्वेमार्गातून चालणे यामुळे ठाणे ते कसारा आणि वांगणी भागात ५० अपघातांची नोंद झाली आहे.

या अपघातांमध्ये मृतांचे प्रमाण ४५ आहे. यातही पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. अपघातांची सरासरी काढल्यास प्रत्येक दोन दिवसांत एकाचा अपघातामुळे बळी गेल्याचे समोर येत आहे. करोनाकाळातही रेल्वे अपघात घडत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मध्य रेल्वेमार्गावर अपघातांचे प्रमाण सर्वाधिक असते. दरवर्षी मध्य रेल्वेमार्गावरील ठाणे ते कसारा आणि वांगणी भागात ३ हजार अपघात घडतात. यामध्ये दररोज सरासरी एक किंवा दोन अपघात हे रेल्वेतून पडणे, रूळ ओलांडणे, रेल्वेमार्गातून चालणे, खांबाला धडक यामुळे घडलेले असतात. ठाणे ते कसारा आणि वांगणी रेल्वे स्थानक हद्दीत रेल्वे रूळ ओलांडणे, रेल्वे मार्गातून चालणे यामुळे ५० अपघातांची नोंद करण्यात आलेली आहे. या अपघातात ५ जण जखमी, तर ४५ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यातील जूनमध्ये ११, जुलैमध्ये १६ आणि २३ अपघातांचा समावेश आहे.

99 fights among psychiatric patients in three years in Nagpur
नागपूर: मनोरुग्णांमध्ये तीन वर्षांत ९९ वेळा हाणामारी
Among the vehicles inspected by the RTO 14 percent of the vehicles are polluting
मुंबई : आरटीओने तपासलेल्या वाहनांमध्ये १४ टक्के वाहने प्रदूषणकारी
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?
Xiaomi SU7 EV Launch
बाकी कंपन्यांची उडाली झोप, २४ तासांत धडाधड विकली गेली ‘ही’ इलेक्ट्रिक कार, किंमत…

महिने   मृत्यू   जखमी

जून        ११       ००

जुलै        १६       ००

ऑगस्ट  १८       ०५

एकूण   ४५        ०५