मीरा-भाईंदरमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक ठाणे : जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असताना आता करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढू लागले आहे. जिल्ह्यातील एकूण ५७ हजार ४ रुग्णांपैकी ३१ हजार ९०९ रुग्ण करोनामुक्त झाले असून हे प्रमाण ५६ टक्के आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये सध्या २३ हजार ४४४ सक्रिय रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत असून हे प्रमाण ४१.१३ टक्के आहे. जिल्ह्यातील मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली. ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, उल्हासनगर परिसरात मोठय़ा प्रमाणात करोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे. रुग्णांचे प्रमाण आटोक्यात येत नसले तरी करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण मात्र वाढू लागले आहे. एकूण रुग्णांपैकी ३१ हजार ९०९ रुग्णांनी आतापर्यंत करोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६ टक्के आहे. तर सध्या ४१.१३ टक्के म्हणजे २३ हजार ४४४ रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील १ हजार ६५१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून मृत्यूचे हे प्रमाण २.९० टक्के आहे. शहर एकूण रुग्ण करोनामुक्त सक्रिय रुग्ण मृत्यू ठाणे १३,६७५ ७,२९३ ५,८६७ ५१५ नवी मुंबई ९,६७८ ५,८०४ ३,५६९ ३०५ कल्याण-डोंबिवली १३,२४० ६,४०९ ६,६३३ १९८ मीरा-भाईंदर ५,७४६ ४,११३ १,४३४ १९९ भिवंडी २,८२४ १,८४३ ८३४ १४७ उल्हासनगर ४,४२५ २,३२८ २,०२६ ७१ अंबरनाथ २,७२५ २,१६१ ४५९ १०५ बदलापूर १,४७७ ७१४ ७४३ २० ठाणे ग्रामीण ३,२१४ १,२४४ १,८७९ ९१