जिल्ह्य़ात बुधवारी ८५३ करोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या २ लाख ९ हजार १३८ वर पोहोचली आहे. दिवसभरात १५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, करोनाबळींची संख्या ५ हजार २७६ इतकी झाली आहे.

बुधवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये ठाणे शहरातील २१९, कल्याण-डोंबिवलीतील १९७, नवी मुंबईतील १८१, ठाणे ग्रामीणमधील ७३, मीरा-भाईंदरमधील ६६, बदलापूर शहरातील ४८, अंबरनाथमधील ३३, उल्हासनगर शहरातील २३ आणि भिवंडी शहरातील १३ रुग्णांचा समावेश आहे. तर मृतांमध्ये ठाणे शहरातील चार, मीरा-भाईंदरमधील चार, नवी मुंबईतील तीन, ठाणे ग्रामीणमधील दोन, तर कल्याण-डोंबिवली आणि भिवंडीतील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.