पालकमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह विधान; आगरी-कोळी समाजात नाराजी

ठाणे : पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अभिनेता मयूरेश कोटकर यांना रविवारी रात्री ठाणे पोलिसांनी अटक केली.  त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले असून बुधवारी याप्रकरणी आदेश काढण्यात येणार आहेत.

शिवसेनेचे नगरसेवक योगेश जानकर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ही अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. नवी मुंबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी जोर धरत असताना कोटकर यांनी समाजमाध्यमांवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर टाकल्यामुळे शिवसैनिकही आक्रमक झाले होते.

Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
sharad pawar
धमक्यांना घाबरू नका, ‘त्यांना’ दुरुस्त करण्याची वेळ; शरद पवार यांचे अजित पवारांना थेट आव्हान
reaction of krupal tumane, MP, eknath shinde, ramtek lok sabha constituency, lok sabha election 2024
उमेदवारी नाकारल्यानंतर शिंदे गटाच्या खासदाराची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले “हो मी दुःखी, पण….”
What Ram Satpute Said?
“सुशीलकुमार शिंदेंनी मुख्यमंत्री असताना १२ अतिरेक्यांना वाचवलं”, राम सातपुतेंचा गंभीर आरोप

दरम्यान, मयूरेशला तात्काळ सोडविण्याची मागणी आगरी-कोळी समाजातील तरुणांनी केली असून कायद्यानेच उत्तर देऊ असे तरुणांचे म्हणणे आहे. त्यामुळे विमानतळाच्या नामकरणाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी ठाणे जिल्ह्यातील आगरी-कोळी समाजाकडून करण्यात येत आहे. तर बाळासाहेब ठाकरे यांचे नाव विमानतळास देण्यास शिवसेना आग्रही आहेत. आगरी-कोळी समाजाने दि. बा. पाटील यांच्या नावासाठी मानवी साखळी तयार केली होती. तसेच  जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.

मयूरेश यांना अटक झाल्यानंतर लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीने पाठपुरावा सुरू करून त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. आम्ही कायद्यानेच उत्तर देत आहोत.  – गिरीश साळगावकर,  अध्यक्ष, ठाणे शहर गावठाण कोळीवाडे पाडे संवर्धन समिती