जिल्ह्यात सोमवारी १ हजार २१२ नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे करोनाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १ लाख २४ हजार १७७ इतकी झाली आहे. तर, जिल्ह्य़ात दिवसभरात ३१ जणांचा करोनामुळे मृत्यु झाल्याने एकूण मृतांची संख्या ३ हजार ५५० झाली आहे. सोमवारी आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये नवी मुंबईतील ३७८, कल्याण-डोंबिवली शहरातील २८९, ठाणे शहरातील १८८, मीरा-भाईंदरमधील १५०, ठाणे ग्रामीणमधील ७७, बदलापूरमधील ५५, उल्हासनगरमधील ४८, अंबरनाथमधील २० आणि भिवंडीतील ७ रुग्णांचा समावेश आहे. सोमवारी जिल्ह्य़ात ३१ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये कल्याण-डोंबिवलीमधील १०, नवी मुंबईतील ७, ठाणे शहरातील ५, ठाणे ग्रामीणमधील ५ तर मीरा-भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी आणि अंबरनाथमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.