जिल्ह्यात मंगळवारी १ हजार ३८८  करोनाबाधित  आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील करोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख ६१ हजार ६५९ इतकी झाली आहे.  दिवसभरात ३३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची एकुण संख्या ४ हजार २०५ वर पोहोचली आहे.

मंगळवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये ठाणे शहरातील ३२२, कल्याण-डोंबिवलीतील २९६, नवी मुंबईतील २६४, मीरा-भाईंदरमधील १८५, ठाणे ग्रामीणमधील १६८, उल्हासनगर शहरातील ४८, बदलापूर शहरातील ४७, भिवंडी शहरातील ३३ आणि अंबरनाथ शहरातील २५ रुग्णांचा समावेश आहे. मंगळवारी जिल्ह्य़ात ३३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये नवी मुंबईतील ७, कल्याण-डोंबिवलीतील ७, ठाणे ग्रामीणमधील ५, ठाणे शहरातील ४,  मीरा-भाईंदरमधील ४, उल्हासनगर शहरातील ३, अंबरनाथ शहरातील २ आणि भिवंडीतील एका रुग्णाचा समावेश आहे.