ज्याच्यासोबत सात जन्म काढायचे ठरले होते तो मुलगा तिच्या पसंतीचा नव्हता. त्यामुळे मुलीने त्याला तू नापसंत आहेस हे सांगितले. एवढ्यावरच ती मुलगी थांबली नाही त्याला विषारी चॉकलेट खाऊ घातले ज्यामुळे या मुलाचा मृत्यू झाला. भिवंडीतील दर्गा रोड भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. भिवंडीतील दर्गारोड भागात अक्रम समसुद्दीन अन्सारीचे लग्न समरूबाग येथे राहणाऱ्या समरीन अली या मुलीसोबत ठरले. मात्र तिला अक्रम पसंत नव्हता. त्यामुळे समरीनने त्याला फोन केला आणि त्याला अपशब्द वापरले. एवढेच नाही तर मेरी जिंदगीसे चले जाओ, नहीं तो मैने दिया हुऊ जहर खाओगे असेही या मुलाला सांगितले. त्यानंतर समरीनने अक्रमला विषारी चॉकलेट खाऊ घातले. विषारी चॉकलेट खाल्ल्यावर अक्रमची प्रकृती ढासळली. त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान अक्रमचा मृत्यू झाला. अक्रमच्या नातेवाईकांनी या संदर्भातल भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. भोईवाडा पोलिसांनी याप्रकरणी तपास करत मोबाईलमधील संभाषणाची क्लीप मिळवली. अक्रमला चॉकलेट देणाऱ्या समरीन विरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे.