ठाण्यातील गडकरी रंगायत चौकात बुधवारी रात्री रिक्षावर वृक्ष कोसळून झालेल्या दुर्घटनेत चालक अरविंद राजभर (२८) आणि प्रवासी चंद्रकांत पाटील (५७) या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तर, दोघा मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी भाजपने पालिकेकडे केली आहे.

गडकरी रंगायतन चौक येथे बुधवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास रस्त्याकडेला असलेला एक वृक्ष रिक्षावर कोसळला. या घटनेत रिक्षाचालक अरविंद राजभर आणि प्रवासी चंद्रकांत पाटील यांचा मृत्यू झाला आहे.