वारंवार आवाज उठवूनही कल्याण डोंबिवलीत वाहतुकीत कोणतीही सुधारणा होत नाही. या गंभीर विषयाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कल्याण शहर जिल्हा काँग्रेस समितीतर्फे बुधवारी कल्याणमधील शिवाजी चौकात एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले.  मागील काही वर्षांपासून कल्याण, डोंबिवलीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न चिघळत चालला आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आल्याचे आमदार संजय दत्त यांनी सांगितले. या धरणे आंदोलनात काँग्रेसचे नगरसेवक सचिन पोटे, भिवंडी लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष ब्रिज किशोर दत्त, नगरसेवक विश्वनाथ राणे आदी सहभागी झाले आहेत. धरणे आंदोलनानंतर मंत्रालयात परिवहन राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांची भेट घेऊन कल्याण डोंबिवलीतील वाहतूक समस्येवर प्रभावी उपाय योजण्याची मागणी करणार आहोत, असे दत्त यांनी सांगितले.