देशात, तसंच राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारनं अनेक महत्त्वाची पावलं उचलली आहे. राज्यातही सरकारनं महत्त्वाच्या सेवा सोडून सर्वकाही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडूनही नागरिंका आवश्यक ती काळजी घेण्याचं तसंच न घाबरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. परंतु काही नागरिकांमध्ये भितीचं वातावरण परसल्याचं पहायला मिळत असून काही जणं आपल्या मूळ गावी परतत आहेत. शुक्रवारी रात्री ठाणे स्थानकात बाहेरगावी जाणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवाशांची गर्दी पहायला मिळली होती. अनेक जणांनी या ट्रेनमधून लटकून प्रवासही केल्याचं आपल्याला दिसून आलं.