कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण-डोंबिवलीतील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून इतर सर्व दुकाने ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हा निर्णय घेतला असून त्याचे पालन न करणाऱ्या व्यवसायिकांवर कलम १८८ नूसार कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यासंदर्भात एक पत्रक आय़ुक्तांनी जारी केलं आहे.

करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रामध्ये साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ हा १३ मार्चपासून लागू करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा फैलाव अधिक वाढण्याची शक्यता गृहीत धरून हा कल्याण-डोंबिवली महानगर पालिका श्रेत्रामधील दुकानांसंदर्भात हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानूसार उद्या (शुक्रवार, २० मार्च) सकाळपासून कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या हद्दीतील जीवनावश्यक वस्तू, बेकरी, डेअरी, किराणा दुकाने, मेडीकल स्टोअर्स, रुग्णालय/क्लिनिक, भाजीपाला आदी दुकाने आणि आस्थापना वगळता इतर सर्व दुकाने, व्यावसायिक आस्थापना ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Mumbai, tenders, projects,
मुंबई : तीन प्रकल्पांसाठी ८२ निविदा, आचारसंहितेनंतरच अंतिम निर्णयाची शक्यता
Eight housing projects on track due to Central government Swamih fund
राज्यातील रखडलेल्या गृहप्रकल्पांना संजीवनी! केंद्राच्या ‘स्वामीह’ निधीमुळे आठ प्रकल्प मार्गी
financial year came to an end Be careful when completing transactions
Money Mantra : आर्थिक वर्ष संपत आले; व्यवहार पूर्ण करताना ‘ही’ काळजी घ्या
penalty for car washes in bangalore
तहानलेल्या बंगळूरुमध्ये वाहने धुणाऱ्यांना दंड

नक्की वाचा >> लॉक डाऊन म्हणजे काय? 

नागरिकांनी एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी २० मार्च सकाळी ११ वाजल्यापासून दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कल्याणमध्ये करोनाचे तीन रुग्ण अढळले आहेत.