शहापूर : तालुक्यातील भातसा धरणाचे पाचही दरवाजे शनिवारी सकाळी उघडण्यात आले. भातसा धरण परिसरात पावसाचे वाढणारे प्रमाण लक्षात घेऊन धरणाचे दरवाजे ०.५० मीटर ने उघडण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. यामधून ९ हजार ६३०. ४०  क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग होत असल्याने भातसा नदीकाठी वसलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणारी  शहापूर तालुक्यातील तानसा व वैतरणा याआधीच भरून वाहू लागली आहेत.

Mumbai Pune Expressway The area near Khalapur toll plaza will be free of traffic congestion Mumbai news
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग: खालापूर पथकर नाक्याजवळील परिसर वाहतूक कोंडीमुक्त होणार
69 villages in Vasai will get water from Surya project
वसईतील ६९ गावांचा पाणी प्रश्न मिटला; लवकर सुर्या प्रकल्पातील पाणी मिळणार
Unseasonal rain in some parts of Nashik district
नाशिक जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही पाऊस, गारपीट
in pune Gavathi liquor making in Nursery
पुण्यातील रोपवाटिकेत गावठी दारूचा अड्डा

याआधी ऑगस्टमध्ये भातसा धरणाचे दोन दरवाजे ० .२५ मीटरने उघडण्यात आले होते त्यावेळी १ हजार २४६.२६ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. भातसा धरण परिसरात आत्तापर्यंत २३१८.०० मिमी इतका पाऊस झाला आहे तर गेल्या वर्षी एकूण २५२०.०० मिमी पाऊस झाला होता. धरणातील एकूण पाणीसाठा ९६७.२९३ द.ल.घ.मी. इतका असून उपयुक्त पाणीसाठा ९३३.२९३ द.ल.घ.मी. आहे. धरणाच्या पाण्याची पातळी १४१.७० मीटर एवढी आहे तर धरणाची पूर्ण संचय पातळी १४२.०७ मीटर आहे.  धरण परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.