मोरिवली येथील औद्योगिक वसाहतीमधील एका आस्थापनात शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास भीषण आग लागली. ‘मीरा परफ्युमरी वर्क’ असे या अस्थापनाचे नाव असून, या कंपनीत अगरबत्ती आणि सुगंधी द्रव्यांचे उत्पादन घेतले जात असल्याची माहिती अंबरनाथच्या अग्निशमन विभागाने दिली.

अस्थापनातील कामकाज रात्री आठ वाजता संपत असल्याने कामगार बाहेर पडले होते. असे अंबरनाथचे अग्निशमन अधिकारी भागवत सोनवणे यांनी दिली आहे. काही वेळातच आगीने संपूर्ण कंपनीला व्यापले. या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ नगरपालिकेच्या अग्निशमन दलासोबत आनंदनगर औद्य्ोगिक वसाहतीतील अग्निशमन दल, कुळगाव बदलापूर नगरपालिका, उल्हासनगर आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर आग अटोक्यात आणण्यात यश मिळाले.

अगरबत्ती आणि इतर सुगंधी द्रव्यांची निर्मिती होते. या कच्च्या मालाने पेट घेतल्याने अनेक छोटे-मोठे स्फोट झाले.