समुद्र खवळलेला असल्याने मासेमारी करणे अशक्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पावसाळ्यातील मासेमारी बंदीचा काळ संपल्यानंतर पहिल्यांदाच मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांना समुद्रात भरघोस मासळी मिळण्याची आशा होती, परंतु मच्छीमारांच्या या अपेक्षेवर अक्षरश: पाणी फिरले आहे. मच्छीमारांना मासे न पकडताच रिकाम्या हातांनी समुद्रकिनाऱ्यावर परतावे लागले आहे. समुद्र अद्याप खवळलेल्या स्थितीतच असल्याने मासेमारी करणे अशक्य होऊन बसले असल्याने उत्तनसह वसई-विरार आणि मुंबईच्या बहुतांश मासेमारी नौका किनाऱ्यावर परतल्या आहेत. यात मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fishing ban in bhayandar
First published on: 11-08-2018 at 01:45 IST