नव्याने बांधकाम करण्याची शेतकऱ्यांची मागणी

शेतीसाठी बांधण्यात आलेल्या खानिवडे बंधाऱ्याला गळती लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. हा बंधारा जुना असल्याने त्याला गळती लागली असून बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यापेक्षा बंधारा नव्याने बांधावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
nilesh rane paid 25 lakhs to pune municipal corporation to settle the tax dues
पुणे: निलेश राणे यांच्यासाठी महापालिकेच्या पायघड्या; अवघे २५ लाख भरल्यानंतर मिळकतकराची थकबाकी शून्य
traffic problem in Pune
पुण्यातील बिघडलेल्या वाहतूक समस्येची उच्च न्यायालयाकडून दखल, परिस्थितीचा फेरआढावा घेण्याचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश
tipeshwar sanctuary, archi tigress, cubs, attracting tourists, viral video, yavatmal, nagpur,
VIDEO : टिपेश्वरच्या जंगलात “आर्ची” आणि तिच्या बछड्याने पर्यटकांना लावले वेड

पावसाळा संपल्यानंतर वसई तालुक्यात बंधाऱ्यांच्या दुरुस्तीच्या कामांना वेग येतो. यंदा पावसाळा लांबल्याने कामे करण्यास विलंब झाला आहे. सध्या तालुक्यात अडवणीच्या लाकडी फळ्या व माती भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. वसईतील खानिवडे येथील कोकणी प्रकारातले बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम जवळपास पूर्ण झाले असून या बंधाऱ्याच्या पाण्याद्वारे खानिवडे, खराटतारा, नवसई, जांभूळपाडा, भाताणे, भालिवली येथील शेतकरी दरवर्षी सफेद कांदा, भेंडी, गवार, मुळा, पालक, कोथिंबीर, दुधी, कारली, टोमॅटो अशा प्रकारचा भाजीपाला पिकवला जातो.

यंदा पाऊस अनियमित पडल्याने खरीप हंगापाने शेतकऱ्यांना धोका दिला. खरीप हंगामातील उणीव रब्बी हंगामात भरून काढण्यासाठी शेतकरी तयारीत आहेत, मात्र खानिवडे येथील बंधाऱ्याला गळती लागल्याने शेतकरी चिंतेत आहेत. दरवर्षी पावसाळा संपताच तानसा खाडीवरील या बंधाऱ्यामुळे सभोवती असलेल्या डोंगरांवरून उतरणारे पाणी अडवून ते साठवले जाते. मात्र १९८४मध्ये म्हणजेच ३४ वर्षांपूर्वी बांधलेल्या या बंधाऱ्याला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे गोडय़ा पाण्यात समुद्राच्या भरतीचे पाणी मिसळून क्षारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होत असल्याचे खानिवडे येथील शेतकरी विश्वनाथ कुडू यांनी सांगितले. यासाठी नवीन बंधारे बांधून देण्याची किंवा बंधाऱ्याची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.