करोना व्हायरसचा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील आणखी एका महापालिका क्षेत्रात लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यासाठी आधीपासूनच सुरु असलेला लॉकडाउन आता आणखी वाढवण्यात आला आहे.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी निजामपूर महापालिका क्षेत्रात लॉकडाउन १९ जुलै पर्यंत वाढवण्यात आला आहे. महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी यासंबंधी आदेश दिला आहे. दोन जुलैपासून भिवंडीमध्ये लॉकडाउन सुरु आहे. पीटीआयने हे वृत्त दिले आहे.

ठाणे जिल्ह्यातील अन्य महापालिका क्षेत्रात तसेच ठाणे ग्रामीण भागात १९ जुलैपर्यंत लॉकडाउन आधीच वाढवण्यात आला आहे. शनिवारी रात्रीपर्यंत भिवंडीमध्ये करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २,७०१ होती तर आतापर्यंत करोनामुळे इथे १४४ जणांचा मृत्यू झाला आहे.