येत्या ९ ऑगस्टला होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चा मुंबई येथील आझाद मैदान येथे येवून धडकणार आहे. या मोर्चाच्या जनजागृतीसाठी आज ठाण्यातील मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने भव्य बाईक रॅलीच आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाण्यातील शेकडो लोकांना यात सहभाग नोंदवला. दरम्यान, ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणाबाजीने ठाणे दणाणून सोडले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच कोपर्डी प्रकरणातील आरोपींना कडक शासन व्हावे, असे अनेक विषय हाताशी घेवून मराठा क्रांती मोर्चाचे राज्यभरात आयोजन करण्यात आले होते. गेल्या ६ महिन्यांपासून थंड पाडलेले हे वादळ आता ९ ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदान येथे धडकणार आहे. ठाण्यातील तीन हाथ नाका येथून सुरु झालेली ही रॅली माजिवडा मार्गे घोडबंदर रोडवरून कासारवडवली तेथून मानपाडा मार्गे उपवन, माजिवडा हिरानंदानी करत केसरमिलहून ठाण्यातील प्रसिद्ध मासुंदा तलाव येथे सांगता करणार आहे. यावेळी जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.