ठाण्यातील जांभळी नाका येथे बाळ गोपाळ मित्र मंडळ, नारळवाला चाळ यांच्या वतीने नेत्रदानाचा संदेश देत तुळशी विवाह आयोजित करण्यात आला होता.यामध्ये नेत्रहीन मुले सहभागी घेतला .

ज्याच्याजवळ ज्या गरजेच्या गोष्टीची उणीव असते त्या व्यक्तीला वस्तूचे महत्त्व विशेषत्वाने कळते, असा एक सिद्धान्त आहे. या सिद्धान्तावरूनच म्हटले जाते, की एका सेकंदाचे महत्त्व किती आहे हे सेकंदाच्या फरकाने स्पर्धा हरलेल्या व्यक्तीला विचारा. तसेच दृष्टीचे महत्त्व किती आहे, याची जाणीव तुम्ही एखाद्या प्रज्ञाचक्षू बांधवाच्या दृष्टीने दुनिया समजून घ्यायचा प्रयत्न कराल तेव्हाच जास्त प्रकर्षाने होईल.यासाठी नेत्रदान केले तर आपण एखाद्याला दृष्टी देऊन शक्ती यासाठी नेत्रदान करा असा संदेश देण्यासाठी अवयवदान चळवळीचे प्रणेते विलास ढमाले यांच्या बाळ गोपाळ मित्र मंडळाच्या वतीने तुळशी विवाह आयोजित करण्यात आला होता. यामध्ये नेत्रहीन मुलांनी सहभाग घेतला यावेळी आमदार संजय केळकर,जिव्हाळा महिला मंडळाच्या अध्यक्ष मंजिरी ढमाले आदी सह मान्यवर यावेळी उपस्थित होते. यंदा या तुळशी विवाहाचे ७९ वे वर्ष असल्याने नेत्रदानाचा संदेश देण्यात आला.

नेत्रदान या संकल्पनेबाबत आपल्या समाजात अद्याप मोठ्या प्रमाणावर जनजागृती होण्याची गरज आहे. या संकल्पनेचा म्हणावा तितकासा प्रचार आणि प्रसार झालेला नाही. नेत्रदानाचा संकल्प सोडण्याअगोदर या विषयाची गरज आणि आपल्याला त्यात देता येऊ शकणारे योगदान या मुद्द्यांविषयी समाजाच्या तळागाळात संदेश पोहोचला तरीही मोठ्या प्रमाणावर अंधत्व निवारणासाठी चालना मिळू शकते, तसेच मृत्यूनंतर नेत्रदान करणे सरकारने बंधनकारक केले तर देशात कोणाचं अंध राहणार नाहीत अशी भावना यावेळी विलास ढमाले यांनी व्यक्त केली.या तुळशी विवाहाच्या माध्यमातून एकाच दिवसात सुमारे १२८ नेत्रदानाचे फॉम भरण्यात आले.