आशीष धनगर, लोकसत्ता

ठाणे : रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ांत महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या तीन जिल्ह्यांमधील १०९ खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये ही योजना राबविण्यात आली असून या योजनेत गेल्या आठ महिन्यांत ३१ हजार ९२५ रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. या योजनेचा सर्वाधिक लाभ मूत्रपिंड रोग आणि कर्करोगाच्या रुग्णांना झाल्याची माहिती समोर आली आहे.

Thane district, schools are now tobacco free, health departments, students
ठाणे जिल्ह्यातील ९३६ शाळा तंबाखूमुक्त
condition of primary health centers in state is pathetic beds in rural hospitals are utilized only at 40 percent capacity
राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था दयनीय, ग्रामीण रुग्णालयांतील खाटांचा वापर केवळ ४० टक्के क्षमतेनेच
Cleanliness Survey Nashik Zilla Parishad to Inspect Over 10 thousand Water Sources for Water Quality
नाशिक जिल्ह्यातील १० हजारहून अधिक जलस्त्रोतांची तपासणी
Two nurses have been immediately suspended for transfusing blood of wrong blood group to two patients in Aundh District Hospital Pune news
रुग्णांच्या जिवाशी खेळ महागात! जिल्हा रुग्णालयातील दोन परिचारिका तत्काळ निलंबित

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य आणि प्रधानमंत्री जन आरोग्य या दोन्ही योजना राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत संपूर्ण राज्यात राबवण्यात येत आहे. या योजनेसाठी कोकण विभागातील ठाणे, पालघर आणि रायगड या तीन जिल्ह्यांचे मिळून एक क्षेत्रीय कार्यालय आहे. पिवळी आणि केशरी शिधापत्रिका असलेल्या नागरिकांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. या योजनेमध्ये विविध आजारांनुसार विम्याची रक्कम ठरविण्यात आली आहे. योजना राबविल्या जाणाऱ्या रुग्णालयात रुग्ण दाखल झाल्यानंतर शिधापत्रिका आणि ओळखपत्र जमा करून घेतले जाते. त्यानंतर रुग्णावर उपचार करण्यात येतात. या उपचाराची माहिती राज्य आरोग्य सोसायटीचे अधिकारी तसेच कर्मचारी घेतात. तसेच रुग्णावर खरोखरच उपचार झाले आहे की नाही, याचीही खातरजमा करतात. त्यानंतरच सोसायटीमार्फत रुग्णालयाला उपचाराचे पैसे अदा करण्यात येतात. ही सर्व प्रक्रिया रुग्णालय, आरोग्य हमी सोसायटी व विमा कंपनी यांच्यामार्फत पार पडते.

करोनाकाळात शासकीय रुग्णालयांचे करोना रुग्णालयात रूपांतर केल्यामुळे या योजनेत समाविष्ट असणाऱ्या आजारांच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयांनाही परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे खासगी आणि सरकारी मिळून ठाणे जिल्ह्यात ६८, पालघर जिल्ह्यात १९ आणि रायगड जिल्ह्यात २२ रुग्णालये आहेत. या तीनही जिल्ह्यांतील १०९ रुग्णालयांमध्ये १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या काळात कर्करोग, मूत्रपिंड रोग, स्त्रीरोग, हाडांच्या शस्त्रक्रिया अशा विविध आजारांच्या ३१ हजार ९२५ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील ७ हजार ६१६, तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील २४ हजार ३१२ रुग्णांचा समावेश आहे. या सर्व रुग्णांच्या उपचारासाठी ६१ कोटी ४३ लाखांचा खर्च आला असून ही रक्कम राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत संबंधित रुग्णालयांना देण्यात आली आहे.

रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत जनआरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. या योजनांसंदर्भात नागरिकांना संपूर्ण माहिती देण्यात येत असून रुग्णांना येणाऱ्या अडचणी  सोडविण्यात येत आहेत. केशरी, पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ देण्यात येतो.

– डॉ. वैभव गायकवाड, क्षेत्रीय व्यवस्थापक, जनआरोग्य योजना