कल्याण, डोंबिवली, बदलापूर या भागांमध्ये पावसाला सुरूवात झाल्यानंतर काही वेळातच परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे वीजेचे खांब कोसळले. तर काही ठिकाणी केबल तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला.

महावितरण कडून याबाबत पाठपुरावा करण्यात आला आहे. तसेच खंडित झालेला वीजपुरवठा लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रयत्न करत आहोत असे महावितरण कडून सांगण्यात आले आहे.