गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या वरुणराजाने रविवारी दुपारी कल्याण आणि नवी मुंबईकरांना दिलासा दिला. कल्याणमध्ये दुपारी दोनच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. सकाळपासूनच कल्याण येथे ढगाळ वातावरण होते. तर, दक्षिण मुंबईतही पावसाने हजेरी लावली आहे पावसाच्या आगमनामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.