मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापासून साऱ्यांचेच लक्ष ‘चातका’सारखे पावसाकडे लागले आहे. खरे म्हणजे पावसाची वर्दी पक्षी देतात. चातक आणि पावशा हे पक्षी नजरेस पडले की पाऊस येणार असे म्हटले जाते. हे पक्षी वसईतील पक्षीमित्रांना नजरेस पडले असून पाऊस लवकरच पडणार असा संदेश घेऊन ते आल्याने वसईकर सुखावले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्रामीण भागात आजही पावसाचा अंदाज हा निसर्गातील बदलांवरूनच वर्तवला जातो. मच्छीमार, शेतकरी, मीठ कामगार, शेतमजूर हे सगळे निसर्गातील बदलांवरूनच पावसाचे भाकीत करत असतात. पक्ष्यांच्या याच सवयीवरून पाऊस जवळ आल्याचे म्हटले जाते. वसईच्या ग्रामीण भागात ‘पेर्ते व्हा, पेर्ते व्हा’ अशी शिळा सध्या कानावर पडू लागली आहे. याचा अर्थ असा की शेतकऱ्यांना पेरणीची सूचना देणाऱ्या आणि पावसाच्या आगमनाचा संदेश देणाऱ्या पावशा पक्ष्याचे आगमन झालेले आहे. या पक्ष्याचा आकार कबुतराएवढा असून करडय़ा राखी वर्णाचा, निमुळत्या सरळ चोचीचा असून तांबूस तपकिरी रंगाची छाती असते. त्यांचे डोळे आणि चोच पिवळ्या रंगाचे असतात. स्थानिक स्थलांतरित करणारा पक्षी असून पावसाळ्यात हे पक्षी भारतात येत असल्याचे पक्षी अभ्यासक सचिन मेन यांनी सांगितले.

More Stories onवसईVasai
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rainy season birds in vasai
First published on: 11-06-2016 at 01:45 IST