शालान्त परीक्षेत ८९ टक्के आणि बारावीत ८५ टक्के गुण मिळवलेल्या कुठल्याही विद्यार्थ्यांला २००२ साली व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला असता. विज्ञान विषयातील कुठल्याही पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन पुढे त्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्यापण त्या वेळी जास्त होती. अशा वेळी धोपट मार्ग सोडून ठाणे शहरातील एक मुलगी दापोलीच्या कृषी विद्यापीठात प्रवेश घेते, ही विशेष गोष्ट होती. सीमा हíडकर ही मुलगीच अशी विशेष होती. सीमाचे बालपण ठाण्याजवळील येऊरच्या जंगलात गेले. १९८०-९०च्या दशकात येऊरचा ठाण्याशी संपर्क आजच्याएवढा नव्हता. हर्डिकर कुटुंब शास्त्रीनगरला राहायला आल्यानंतरही घरापुढील बागेत सीमाचे निसर्गप्रेम बहरत गेले. आई आणि काकाबरोबर बागकाम करताना अपोांप बागेतील फुले, झाडे यांबद्दल तिला प्रेम आणि आवड निर्माण झाली.सरस्वती सेकंडरी स्कूलमध्ये सहावीत असताना वर्गातील इतर मत्रिणींबरोबर तिने प्रथम राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत भाग घेतला होता. त्यांचा विषय होता ‘ठाण्यातील मध्यवस्तीत असलेल्या तांबे हॉस्पिटल परिसरातील ध्वनिप्रदूषण’. आठवीत असताना त्यांच्या गटाचा विषय होता ‘मधल्या सुट्टीतील डबा’. हे दोन्ही प्रकल्प राष्ट्रीय पातळीवर निवडले गेले होते. प्रकल्पाच्या वेळी प्रत्यक्ष फिल्डवर्क करताना अनेक तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाचा लाभ या मुलांना मिळाला होता. मुख्य म्हणजे अशा फिल्डवर्कची आवड निर्माण झाली होती. अकरावी-बारावीत असताना हरियालीच्या सिंगवीसर, डॉ. पेजावर आणि इतर सभासदांबरोबर येऊरचे जंगल, निसर्गशिक्षण या भूमिकेतून फिरणे सुरू झाले. या निसर्गभ्रमंतीतून वनस्पतिशास्त्राबद्दलची जिज्ञासा सीमाच्या मनात रुजू लागली.शालेय वयातील संशोधनाचे संस्कार आणि निसर्गाबद्दलची आवड बरोबर घेऊनच सीमाने शेतकी शास्त्रातील पदवी अभ्याक्रम सुरू केला. सीमाचे दोन्ही आजी-आजोबा कोकणातलेच. वडिलांनी माळरानावर आंब्यांची लागवड केलेली. त्यामुळे कोकणातील मातीशी तिचे नाते जोडलेले होते. सीमा नुसती शेती विषयात पदवीधर झाली नाही तर विद्यापीठात पहिली आली. त्याबरोबच ती बाळासाहेब सावंत आणि सर रॉबर्ट अॅलन सुवर्णपदकाची मानकरी ठरली. कृषी विद्यापीठातली सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून महाराष्ट्राच्या राज्यपालांनी कुलपती पदक प्रदान करून तिच्या यशावर सुवर्ण कळस चढवला.उच्च शिक्षणासाठी सीमाने संशोधनाच्या माध्यमातून एम.एस्सी. करण्यासाठी पुण्यातील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. आपल्या एम.एस्सी.च्या अभ्यासक्रमासाठी तिने उद्यानविद्या विभाग (ऌ१३्रू४’३४१ी) हा विषय निवडला. यासाठी तिने डॉ. काटवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ग्लॅडिलस’ची लागवड हा विषय निवडला. वर्षभर मित्र-मत्रिणीच्या साह्याने स्वत:च्या देखरेखीखाली रोपांची शास्त्रोक्त पद्धतीने वाढ करून त्याची नियमितपणे नोंद ठेवली. वर्षांखेरीस जेव्हा फुले बहरली तेव्हा तिच्या मित्र-मत्रिणींनी तिला फुलनदेवी हा किताब दिला. त्या वर्षी राहुरी कृषी विद्यापीठातून एम.एस्सी.ला ती पहिली आली होती.यापुढे ती पीएच.डी.ला प्रवेश घेईल अशी सर्वसाधारणपणे अपेक्षा होती. सीमाने इथेपण सर्वाचा अपेक्षाभंग केला. पीएच.डी.चा अभ्यासक्रम तिला संकुचित आणि पुस्तकी वाटला. एम.एस्सी. करीत असताना तिने पुण्यातील नामांकित आघारकर संशोधन संस्था आणि निसर्गसेवक यांनी एकत्रितपणे आयोजित केलेला फिल्ड बॉटनीचा प्राथमिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला होता. या अभ्याक्रमाच्या दरम्यान एकंदरीतच तिला निसर्ग आणि विशेषत: वनस्पतिशास्त्राचे आकर्षण वाटू लागले.निसर्गाच्या मोकळ्या विशाल प्रयोगशाळेत फिल्डवर्क करीत पुढे शिकण्याचा तिने निर्धार केला. साहजिकच फिल्ड बॉटनीचा एक वर्षांचा प्रगत अभ्यासक्रम तिने पूर्ण केला. या दोन्ही कोर्सच्या निमित्ताने तिचा वनस्पतिशास्त्राचा पुस्तकी आणि प्रत्यक्ष अनुभव असा दोन्ही अभ्यास झाला. विदर्भातील नागझिरा, नवेगाव बांध, गोंदियामधील जंगले, तेथील झाडे, वनस्पती, वेली यांबरोबरच तळ्याकाठची परिसंस्था यांचा अभ्यास झाला. त्याबरोबरच महाराष्ट्रातील माळराने, पठार, अभयारण्ये, पाणथळ जागा, समुद्रकिनारे अशा विविध भौगोलिक प्रदेशांतील परिसंस्था या सर्वाचाच तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली सखोल अभ्यास करता आला. ही सर्व भ्रमंती करताना पक्षीनिरीक्षण हा छंद स्वाभाविकपणे जपला जातो. पक्षीशास्त्राची शास्त्रोक्त ओळख व्हावी म्हणून सीमाने या विषयाचापण प्रमाणपत्र अभ्याक्रम पूर्ण केला. या सर्व उद्योगांबरोबर सीमाने राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेच्या कामात पूर्णपणे वाहून घेतले आहे. विशेषत: महाराष्ट्रातील ग्रामीण आणि दुर्गम भागात आदिवासी बाल विज्ञान परिषदेसाठी शिक्षक विद्यार्थी कार्यशाळेत ती गेली सहा वर्षे नियमितपणे मार्गदर्शन करीत आहे. मागील वर्षी जिज्ञासा ट्रस्टने बावीस ग्रामीण जिल्ह्यांतून दोन हजार कि.मी.ची गणित यात्रा काढली होती. या उपक्रमाची संपूर्ण जबाबदारी सीमाने प्रकल्प अधिकारी म्हणून समर्थपणे पेलली.सीमाच्या या अनेक क्षेत्रांतील भटकंतीचे श्रेय तिचा जीवनातील जोडीदार सुबोधला आहे. एका यशस्वी बाईच्या मागे एक पुरुषसुद्धा असू शकतो हे सुबोधने सिद्ध करून दाखवले आहे. सुबोधच्या साथीने सीमाने आत्ता निसर्गशास्त्राचे शिक्षण देणारी संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या वतीने वयस्कर आणि तरुण आशा दोन्ही वयोगटांतील निसर्गप्रेमींसाठी ‘फिल्ड बॉटनी अॅण्ड बियॉण्ड’ नावाचा कोर्स आयोजित केला आहे. मार्च ते मे अखेरीपर्यंत फक्त वीकएंडला घेतल्या जाणाऱ्या या कोर्समध्ये बारा फिल्ड व्हिझिटचा समावेश आहे. महाराष्ट्रातील वनस्पतिशास्त्रातील जाणकार आणि तज्ज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शक म्हणून यायचे मान्य केले आहे. सीमाची आतापर्यंतची वाटचाल बघता ती या नवीन उपक्रमात यशस्वी होईल यात शंका नाही. नुसता पुस्तकी अभ्यास पूर्ण करून पशाच्या हिशेबात आणि घडय़ाळाच्या काटय़ात अडकून पडण्यापेक्षा आपले आयुष्य अधिक सहज आणि सुंदरपणे जगता येते हे सीमाने आजच्या पिढीला दाखवून दिले आहे.