पावसाळा तोंडावर आला असून पुढील १५ ते २० दिवसामध्ये जिल्ह्यत पाऊस सक्रिय होण्याचे संकेत जिल्हा प्रशासनाकडून दिले जात आहेत. शहरातील सांडपाणी जलदगतीने शहराबाहेर जाण्यासाठी नाल्यांची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नालेसफाई होणे आवश्यक असते. मात्र शहरातील अनेक नाल्यांमध्ये अद्याप सफाईचे काम सुरूच झालेले नाही. त्यामुळे शहरातील नाले कचऱ्याने भरलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली शहरातील नाल्यांची सद्यस्थिती दर्शविणारी ही छायाचित्र मालिका. दीपक जोशी