खरेतर शहरातील उद्याने हा धावपळीच्या जीवनातील विसावा असतात. मुलांनी तिथे मनसोक्त खेळावे, ज्येष्ठ नागरिकांनी आराम-व्यायाम करावा, असे अपेक्षित असते.काही अपवादात्मक उद्यानात असे चित्र दिसत असले तरी बहुतेक उद्याने म्हणजे अपकृत्यांचा अड्डा बनली आहेत. लाखो रुपये खर्चून महापालिका प्रशासनाने बांधलेल्या या उद्यानांचे अवस्था अतिशय केविलवाणी आहे..