काळानुरूप शहराच्या बाह्य़रूपात बदल होणे स्वाभाविक असले तरी काही गोष्टी शहराची ओळख असतात. त्या शहराचे नाव निघाले की त्या बाबी चटकन नजरेसमोर येतात. उदा. कल्याण म्हटले की येथील जुने वाडे, टांगे, भारतभर रेल्वेने जाण्यासाठी गाडी उपलब्ध असलेले जंक्शन स्थानक आठवते, तसेच शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शिवाजी चौकातील प्रभाकर ओक टॉवरही. कल्याणच्या मुख्य चौकातील हा टॉवर आता या शहराची ठळक खूण बनला आहे. मुंबईतील राजाबाई टॉवरवरील घडय़ाळाप्रमाणे या टॉवरवरही घडय़ाळ आहे. आता आजूबाजूच्या इमारतींनी पुनर्विकासात टॉवरची उंची गाठण्यास सुरुवात केली असली तरी ओक टॉवर आपली शान राखून आहे. (जुने-नवे छायाचित्र-दीपक जोशी)