कल्याण : कल्याण तालुक्यातील खडवली येथील भातसा नदीत गुरुवारी दुपारी दोन तरुण बुडाले. अग्निशमन जवान, पोलीस आणि स्थानिकांनी तात्काळ शोधकार्य हाती घेतले. मात्र त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. जोगेश्वरी येथील ११ तरुणांचा गट खडवली येथे सहलीसाठी आला होता. दुपारच्या वेळेत या तरुणांमधील काही जण भातसा नदीत पोहण्यासाठी उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने कृष्णा धरणे (१९), अक्षय बरणे (२१) हे पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ लागले. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर इतर तरुणांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.