* केंद्र सरकारच्या टपाल विभागातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी ही महत्त्वपूर्ण योजना आहे.* केंद्र सरकारचे सुरक्षा कवच असणारी ही योजना गुंतवणूकदारांना आठ टक्के दराने परतावा देते.* या योजनेमध्ये सहा वर्षांनंतर गुंतवणूक रकमेच्या पाच टक्के बोनसही मिळू शकतो.* या योजनेतील किमान गुंतवणूक दीड हजार रुपये आहे, तर कमाल मर्यादा साडेचार लाख रुपये आहे. दुहेरी खाते असेल तर कमाल मर्यादा नऊ लाख रुपयांपर्यंत आहे.* या योजनेपासून मिळणारे व्याजरूपी उत्पन्न करपात्र असले तरी टीडीएस कापला जात नाही.* ही योजना अत्यंत सुरक्षित, दरमहा निश्चित व्याज व चांगला परतावा देते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये ती अत्यंत लोकप्रिय आहे.