ठाणे : कल्याण-शीळ मार्गावरील काटई येथे फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शनिवारी सायंकाळी पुर्ण करत एमआयडीसीने चोवीस तासानंतर जिल्ह्यातील शहरांचा पाणी पुरवठा सुरु केला आहे.

ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांना पाणी पुरवठा करणारी १७१२ मि.मी. व्यासाची ‘एमआयडीसी’ची जलवाहिनी कल्याण-शीळ मार्गावरील काटईजवळ शुक्रवारी सायंकाळी फुटली.

यामुळे ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथमधील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. ठाणे शहरातील वागळे इस्टेटचा काही भाग, कळवा, मुंब्रा, दिवा तर, कल्याण-डोंबिवलीमधील एमआयडीसी, २७ गावे आणि शहाड भागाचा पाणीपुरवठा बंद होता.