अपहृत मुलीचा शोध न लागल्याने आंदोलन; पोलीस तपासात टाळाटाळ करत असल्याचा आरोप महिना उलटून गेला तरी अपहृत मुलीेचा शोध पोलीस लावू न शकल्याने एका महिलेने चक्क पोलीस ठाण्याच्या पायरीवरच ठाम मांडत उपोषणाला सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ही महिला या ठिकाणीे बसलीे आहे. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच माझी मुलगीे सापडत नसल्याचा आरोप या महिलेने केला आहे. फरझाना शेख ही महिला वसई-कोळीवाडय़ात राहते. तिचीे १६ महिन्यांचीे मुलगीे गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता आहे. याच ठिकाणीे टेलरिंगचे काम करणाऱ्या सद्दान मोहम्मद नावाच्या मुलाने तिला फूस लावून पळवून नेल्याचा त्यांचा आरोप आहे. २१ नोव्हेंबर रोजी तिचीे मुलगीे बेपत्ता असल्याचे समजताच फरझाना यांनी वसई पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिलीे. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून घेतला, परंतु शोध घेण्यास टाळाटाळ केलीे, असा आरोप त्यांनी केला. मीे पोलिसांना सर्व वस्तुस्थितीे सांगितलीे. पण पोलिसांनी तत्परतेने दखल घेतलीे नाही, असेही त्या म्हणाल्या. २१ नोव्हेंबर रोजी वसई पोलीस ठाण्याचे एक पथक उत्तर प्रदेशातीेल गोरखपूर येथे जाऊन आले. परंतु तिच्या मुलीेला पळवून नेणारा मुलगा सापडला नाही. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच तो पसार झाल्याचे फरझाना यांनी सांगितले. त्यामुळे सहनशक्तीे संपल्याने फरझाना यांनी वसई पोलीस ठाण्याच्या पायरीवरच सोमवार पासून ठाण मांडत उपोषणाला सुरवात केली आहे. जोपर्यंत माझी मुलगीे सापडत नाही, तो पर्यंत मीे येथून हटणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पोलीेस आपले काम पार पाडत आहे. आम्ही गुन्हा दाखल केला असून अपहरणकर्त्यांचा शोध घेत आहोत. पोलिसांनी चालढकलपणा केला, असा आरोप चुकीचा आहे. आम्ही लवकरात लवकर त्याला शोधून काढ श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक, वसई