भगवान मंडलिक
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशभरात जल्लोषात साजरा होत असताना, ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील दुर्गम भागातील २५ आदिवासी पाडे, वस्त्या वीज पुरवठा, रस्ते, पाण्यापासून वंचित आहेत. या वस्त्यांकडे शासन, लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही. त्यामुळे वर्षानुवर्ष डोंगर दऱ्यातील दगड, मातीच्या कच्च्या रस्त्यावरुन येजा करणे हेच या येथील आदिवासींच्या नशिबी आहे, अशी माहिती श्रमजीवी संघटनेचे सचिव शहापूर तालुका प्रमुख प्रकाश खोडका यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहापूर तालुक्यात सर्वाधिक आदिवासी वस्ती आहे. शासनाच्या अनेक योजना आदिवासी विकासासाठी असल्या तरी स्थानिक प्रशासकीय यंत्रणा या योजना प्रभावीपणे आदिवासी भागात राबवित नसल्याने स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात आदिवासी पाड्यांवर रस्ते नाहीत. वीज आली नाही, अशी माहिती सचिव खोडका यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 25 tribal pada roads deprived of electricity even in the amrit mahotsav of independence amy
First published on: 12-08-2022 at 15:27 IST