बारवी धरणाची उंची वाढविण्यात आल्याने धरणातील पाणी साठा वाढला आहे. त्यामुळे या साठ्यातील मुबलक पाणी २७ गावांना मिळाले पाहिजे. या गावांच्या हक्काचे पाणी त्यांना मिळाले पाहिजे यासाठी आपण प्राधान्याने प्रयत्न करणार आहोत, असे डोंबिवली विधानसभा भाजप आमदार, कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे सांगितले.

कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर आ. चव्हाण यांचे शहरातील विविध संस्था, भाजप पक्ष पदाधिकाऱ्यांनी सत्कार समारंभ आयोजित केले आहेत. भोपर येथील भाजप स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आयोजित कार्यक्रमात शुक्रवारी मंत्री चव्हाण बोलत होते.

Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
abhay daga upsc marathi news, abhay daga upsc latest marathi news
“नव्या स्वरूपातील गुन्हे सोडविण्याचे आव्हान झेलणारा पोलीस अधिकारी होणार”, सनदी सेवेत निवडप्राप्त अभय डागाची मनिषा
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?

२७ गाव परिसराची लोकवस्ती वाढत आहे. नवीन गृहसंकुले या भागात उभी राहत आहेत. या परिसराचे नागरीकरण झाले आहे. नवीन वसाहतींना पाणी आणि मूळ गावांना पाणी नाही ही परिस्थिती यापुढे सहन केली जाणार नाही. यासाठी या गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आपण स्वता शासन स्तरावर प्रयत्न करणार आहोत, असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

सागाव, देसलेपाडा, नांदिवली भागाचा पाणी प्रश्न अधिकच बिकट आहे. या भागातील रहिवाशांना पाण्यासाठी पालिका, एमआयडीसीकडे जावे लागते. या भागातील रहिवाशांचा पाण्याचा त्रास कमी केला जाईल. या भागाला त्यांच्या हक्काचे पाणी मिळाले पाहिजे यासाठी आपण स्वत एमआयडीसीकडे पाठपुरावा करणार आहोत. २७ गावांना १०५ दशलक्ष पाणी पुरवठा मंजूर आहे. या गावांना प्रत्यक्षात ६० दशलक्ष पाणी पुरवठा केला जातो. या गावांचा उर्वरित पाणी पुरवठा या गावांनाच देण्यात यावा, अशी मागणी आपण शासनाकडे करुन तो पाणी पुरवठा मंजूर करुन घेऊ, असे आश्वासन मंत्री चव्हाण यांनी ग्रामस्थांना दिले.