लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेने मालमत्ता कर आणि पाणीपट्टीवर चालू आर्थिक वर्षासाठी अभय योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत मालमत्ता कर आणि पाणीपट्टीवर १५ जानेवारी २०२५ पर्यंत १०० टक्के दंड आणि व्याज, १६ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२५ पर्यंत ७५ टक्के दंड आणि व्याज माफ होणार आहे.

News About Rambhau Mhalgi Prabodhini
सुशासनासाठी अवकाश व भूस्थानिक तंत्रज्ञान
pandit hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीच्या नोकरीत खरंच होते का? कधी?
municipality is redirecting overflowing Vihar Lake water to Bhandup purification center
विहार तलावाचे पाणी भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात, विहार उदंचन केंद्राचे बांधकाम करण्याचा पालिकेचा निर्णय
43 thousand crores for capital expenditure Mumbai print news amy 95
भांडवली खर्चासाठी ४३ हजार कोटी; प्रमुख प्रकल्पांसाठी निधीचे नियोजन
Union Budget has announced various incentive schemes for textile industry including Cotton Campaign
केंद्रीय अर्थसंकल्पाने वस्त्रोद्योगाचे धागे सुखावले, कापूस अभियानासह प्रोत्साहनपर विविध योजना
अब के सजन सावन में…; कृषीक्षेत्रासाठी सहा नव्या योजना
Budget 2025 IIT IIM MBBS seats
Budget 2025 : IIT च्या ६,५०० व वैद्यकीय महाविद्यालयांतील ७५,००० जागा वाढवणार! अर्थमंत्र्यांची घोषणा
India Climate Change Inflation Agriculture Farmers
व्यवसायाभिमुख पिके हवीत!

कर भरणाऱ्या नागरिकांनी या दोन्ही सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. हा कर भरणा करण्यासाठी पालिकेने ऑनलाईन माध्यमातून सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मालमत्ता कर थकबाकीदारांना पालिकेने वेळोवेळी नोटिसा पाठवून कर थकबाकी भरणा करण्याच्या नोटिसा पाठविल्या आहेत. त्यांच्याकडून विहित वेळेत थकित कर भरणा झाला नाहीतर मात्र संबंधितांची मालमत्ता जप्त करणे, त्यानंतर त्या मालमत्तेचा लिलाव करणे, त्या मालमत्तेसह इतर मालमत्तांवर टाच आणणे या प्रक्रिया पालिकेकडून पार पाडल्या जातील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

आणखी वाचा-जितेंद्र आव्हाड यांनी दिला मंत्री सरनाईकांना मित्रत्वाचा सल्ला

पालिकेला चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कराचे सुमारे ७५० कोटीचे तर पाणीपट्टीचे ९० कोटीचे लक्ष पूर्ण करायचे आहे. यासाठी पालिकेने कर विभागाच्या माध्यमातून मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुली मोहिमा सुरू केल्या आहेत.

सुविधा केंद्रे सुट्टीतही

पालिकेची नागरी सुविधा केंद्रे शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. कल्याण, डोंबिवली पालिका हद्दीतील बहुतांशी नोकरदार हा मुंबई परिसरात नोकरीला जातो. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार , शनिवार या कालावधीत त्यांना कर भरणा, पाणी पट्टी भरणा करणे शक्य होत नाही. अशा नोकरदार वर्गाचा विचार करून प्रशासनाने शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही नागरी सुविधा केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Story img Loader