दोनच प्रवासी घेऊन वाहतूक, लाल बावटा रिक्षा संघटनेची सूचना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली : करोना संसर्गामुळे कठोर निर्बंध लागू होताच, डोंबिवलीतील रिक्षा संघटनांनी आपल्या सदस्यांना दोन प्रवासी घेऊन प्रवासी वाहतूक करण्याच्या सूचना केल्या आहेत. अनेक महिने प्रति प्रवासी २० रुपये भाडे देऊन त्रस्त झालेले प्रवासी रिक्षा चालकांकडून पुन्हा सुरू करण्यात आलेल्या या प्रकारामुळे हैराण झाले आहेत. सोमवारपासून डोंबिवलीत या विषयावरून प्रवासी आणि रिक्षा चालकांमध्ये भांडणे सुरू झाली आहेत. गेल्या वर्षी जूनपासून रिक्षा चालकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी एका रिक्षेत दोन प्रवासी घेऊन प्रति प्रवासी २० रुपये भाडे घेण्यास सुरुवात केली होती. प्रवाशांनी २० रुपये भाडे अनेक महिने दिले. रिक्षा चालकांना एक फेरीत ४० रुपये मिळत असल्याने चालक खूष होते. करोना निर्बंध उठल्यानंतरही रिक्षा चालकांनी तीन प्रवासी आणि शेअर भाडे घ्यावे म्हणून प्रवासी प्रयत्नशील होते. त्याला रिक्षा चालक दाद देत नव्हते. दररोज चाळीस रुपये खर्च करणे शक्य नसल्याने बहुतांशी नोकरदार पायपीट करत होता.  गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शेअर भाडे लागू झाल्यापासून रिक्षा चालकांनी दोन आसन क्षमतेवर प्रवासी भाडे घेणे बंद करून तीन आसनावर प्रवासी घेऊन शेअर पद्धतीने भाडे आकारणीस सुरुवात केली होती.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arbitrariness rickshaw pullers migrants ysh
First published on: 12-01-2022 at 01:56 IST