भगवान मंडलिकटिटवाळा ते मुरबाड रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्र्यांनी करून टिटवाळा ते नगर या रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील मार्गाला हिरवा झेंडा दाखविला आहे. टिटवाळा ते मुरबाड हा रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर विकासाच्या वाटेवर असलेली या भागातील गावे, खेडी, वाडय़ा विकासाच्या मुख्य प्रवाहात येतील. या रेल्वे मार्गामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. मरगळलेल्या स्थितीत असलेल्या या भागातील औद्योगिक वसाहतींना उभरते दिवस येतील. या भागातील पर्यटन स्थळांचा विकास करणे शक्य होईल. आतापर्यंत डोंगरदऱ्यात अडकून पडलेल्या या भागातील खेडुताला दळणवळण आणि पर्यायाने रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होती. कल्याणच्या पलीकडे ठाणे, पुणे आणि नगर जिल्ह्याच्या विकासाला नवी संजीवनी देणारा हा प्रकल्प असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दीडशे वर्षांपूर्वी मुंबई ते ठाणे या मार्गावर रेल्वेचे पहिले इंजिन धावले. या ऐतिहासिक घटनेस तब्बल दीड शतकाचा कालावधी पूर्ण होत असताना ठाणे जिल्’ााच्या ग्रामीण भागात टिटवाळा ते मुरबाड मार्गावर नव्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्याचा निर्धार केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी जाहीर केला आहे. ही घोषणा एकदम झाली असेही नाही. या घोषणेपूर्वी गेल्या ४५ वर्षांपासून जुन्नर, आळेफाटा भागातील काही धडपडे कार्यकर्ते माळशेज रेल्वे कृती समिती स्थापून कल्याण ते माळशेज घाटमार्गे अहमदनगर हा रेल्वे मार्ग रेल्वे मंत्रालयाने मार्गी लावावा म्हणून प्रयत्नशील आहे. कल्याण ते नगर हा रेल्वे मार्ग तयार झाला तर स्थानिक रहिवाशांसोबत सरकारला लाभ मिळेल असे या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा दावा आहे. व्यापार, दळणवळणाचे फायदे आणि वाहतुकीचे विकेंद्रीकरण केले तर रस्ते वाहतुकीवर येणारा ताणही कमी होऊ शकणार आहे. आज इतक्या वर्षांनंतर या नव्या मार्गाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय सुरेश प्रभू यांनी घेतल्याने मध्ये, पश्चिम आणि हार्बर मार्गापुरता विचार करणाऱ्या कल्याण डोंबिवली, ठाणेकरांना आपल्याच भागातून एका नव्या दळणवळण पर्यायाचा लाभ मिळू शकणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on malshej ghat railway route
First published on: 02-03-2016 at 01:54 IST